जाहिरात
Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
अच्युत पालव  चा ळीस बाय पाच फुटांचा कागद सुलेखनाच्या माध्यमातून अवघ्या दोन-तीन मिनिटांत पद्धतशीरपणे भरून टाकण्याची माझी ताकद आहे. ही ताकद मला मोडीने दिली. त्यातला एस्थेटिक सेन्स किती सुंदर आहे. प्रारंभाचे, मधले आणि शेवटाचे अशा प्रत्येक अक्षराचे सौंदर्य दिसते. येथे अक्षरांची तीन-तीन, चार-चार पद्धतीने गुंफण केलेली आहे. त्यातून माझ्यात एक सुलेखनकार म्हणून प्रगल्भता येत गेली. जेव्हा मी मोडी करायला लागतो, तेव्हा ती प्रगल्भता उपयोगात येऊ लागली. जाणकार रसिक विचारू लागले की, तुझी मराठी अक्षरे इतकी छान कशी येतात, वेगळी आणि फोर्सफुल का वाटतात किंवा त्या भाषेची अशी काय खासियत तुझ्याकडे आहे? माझ्या मते, यामागे केवळ वाचन नसते, तर भाषेच्या प्रभावाचा तो परिणाम असतो. हे साधल्यानंतर पुढे मी तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास सुलेखनाच्या माध्यमातून पेश केले. जो माझ्या आयुष्यातला नि:संशय महत्त्वाचा टप्पा होता.   त्या वेळी आयआयटीला मी एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी काम करत होतो. तेव्हा माझे सुलेखनकलेतील ऋषितुल्य शिक्षक र. कृ. जोशींनी मला पहिली संधी दिली. ते म्हणाले, तुझी मोडी लिपी या प्रदर्शनातील लोकांसमोर सादर कर. प्रदर्शनात एक लांबलचक बोट ठेवलेली होती. त्यावर मी माझे सर्व काम मांडून ठेवले. तुम्ही जर चांगले काम करत असाल तर लोक तुमच्यापर्यंत येतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. या प्रदर्शनात लंडन व अन्य देशांमधून डिझायनर आले होते. त्या वेळी माझे काम बघून एक जण मला म्हणाला, वुड यू लाइक टू जॉइन मी? मला ती भंकस वाटली. मला इंग्रजी धड बोलता येत नव्हते. र्जमन भाषा येत नव्हती. तरीही केवळ मराठीच्या बळावर हा माणूस मला आमंत्रण देत होता. त्या वेळी माझ्या मनात विचार आला की, इंग्रजी, र्जमन ही आपली भाषा नाही; तर अक्षर ही आपली भाषा आहे. त्या भाषेला आपण किती वेगळ्या प्रकारे मांडू शकतो, हे महत्त्वाचे आहे. क, ख, ग, ट, ठ, ढ, ण.. आपली भाषा फोनेटिक आहे. हे सगळे परभाषकांना शिकवणे महत्त्वाचे आहे.   सुलेखनयात्रेतला र्जमनी हा माझा पहिला टप्पा पर्यायाने पहिला परदेश प्रवास होता. केवळ ‘मराठीच्या झेंड्यामुळे ही झेप मी घेतली होती. मला आठवते की, र्जमनीत त्या वेळी असह्य उन्हाळा जाणवत होता. माझे सर म्हणाले की, आज काही खरे नाही, वर्कशॉप बंद करू. तर मी उत्तरलो, तसे कशाला करायचे; त्यापेक्षा मी तुम्हाला एक कविता शिकवतो. असे सांगून ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ही कविता उपस्थित विद्यार्थ्यांना ऐकवून दाखवली. मी म्हणालो, हे पावसाचे गाणे आहे. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना बाराखडी शिकवलेलीच होती. कविता ऐकून त्यांनी पावसाचे गाणे चितारायला सुरुवात केली. एका महिलेने माझ्याकडे लांबलचक कागद मागितला. प्रिंटरचा पेपर घेऊन त्यावर कविता लिहिण्यास सुरुवात केली. पण पाऊस आला मोठा यातील ‘मोठा या शब्दाच्या जवळ येऊन ती थांबली. प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाली, मि. अच्युत, व्हॉट डू यू मीन बाय ‘मोठा? मी म्हणालो, मोठा म्हणजे खूप मोठा. एक मोठी सर येते.. पण सगळे तिला समजावून सांगणे खूप कठीण गेले. कारण असा प्रश्न कोणी विचारेल, याची तयारीच मी केली नव्हती. तशातच तिने एक बादली घेतली आणि त्यातील पाणी जोराने फेकले. मी त्यावर म्हणालो, अगदी असेच आहे ते. जे मला अपेक्षित होते, तेच त्या सुलेखन कार्यशाळेत आलेल्या महिलेने केले. याचा अर्थ शब्दार्थ तिला कळला. मग एका र्जमन मुलीने फुलपाखरावरची कविता साकारली. त्यासाठी त्यांना फुलपाखरू म्हणजे नेमके काय, याच्या काही नोट्स दिल्या. त्यानंतर त्या मुलांमध्ये झालेले ट्रान्सफॉर्मेशन अनुभवले होते. गंमत म्हणजे, त्या मुलांनी अभ्यासासाठी देवनागरी लिपी निवडली होती आणि तिचा सखोल अभ्यास सुरू केला होता. मग अक्षरे, आकार, उकार, जोडाक्षरे, रु कुठून आला, साहित्य उलगडून बघण्यासही त्यांनी सुरुवात केली. तुकाराम कोण आहे, ज्ञानेश्वर कोण आहे, पु. ल. देशपांडे कोण, हे सगळे त्यांच्या समोर उलगडायला लागले. खरे तर 1986पासून र्जमनीमध्ये कॅलिग्राफीसाठी मराठी भाषा शिकवण्यास सुरुवात झाल्याचे मला कळले; पण सगळ्यात गंमत म्हणजे, र्जमनीमध्येच एक विदुषी तेथील मुलांना ज्ञानेश्वरी शिकवत असल्याचे बघून तर मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. आपल्या भाषेवर सातासमुद्रापार कोणी तरी प्रेम करतेय, ही भावनाच खूप भारावून टाकणारी होती, त्या वेळी. मराठीमध्ये आणखी जोराने काम केले पाहिजे, याची प्रेरणा अनुभवातून मला मिळाली.     -पान 4 पाहा  <टं1ं3ँ्र 3>‘रसिकमधील लेख वाचा   </टं1ं3ँ्र 3>