जाहिरात
Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
पाकिस्तानातील तुरुंगात डांबून ठेवलेल्या सरबजितसिंगवर क्रूर हल्ला करण्यात आला. उपचार सुरू असतानाच तो मरण पावला. घटना घडलेला देश पाकिस्तान असल्यामुळे भारतात जनक्षोभ उसळून आला. या आकस्मिक घटनेमुळे सरबजितला दहशतवादी ठरवून कायद्याने मृत्युदंड देण्याची पाकिस्तान सरकारकडे असलेली संधी विरोधी गटाकडून हिरावून घेतली गेली आणि भारत सरकारने शहिदाचा दर्जा देऊन सबरजित नेमका कोण असावा, याचे अप्रत्यक्ष संकेत दिले.   मुळात, सरबजितसिंग कोण होता, मद्याच्या धुंदीत सीमा ओलांडलेला ‘निष्पाप नागरिक की भारताने विशेष मोहिमेवर धाडलेला हेर? या अवघड प्रश्नाचे अधिकृत उत्तर कधीही मिळणार नाही, हे उघड असले तरीही या घटनेच्या निमित्ताने जाणकारांमध्ये हेरगिरीचा विषय प्राधान्याने चर्चिला गेला. त्या चर्चेच्या अनुषंगाने हेरगिरीमागील उघड गुपिताचा काढलेला हा माग..  इतिहास   हेरगिरीचा  विश्वास दांडेकर  <टं1ं3ँ्र 3>‘रसिकमधील लेख वाचा   </टं1ं3ँ्र 3> भा रताचा नागरिक सरबजितसिंग याला लाहोरच्या तुरुंगात जीवघेणी मारहाण झाली. त्यात त्याचा मृत्यू ओढवला. यामुळे खेद वाटणे, राग येणे, क्षोभ प्रकट होणे, यात आश्चर्य नाही. तो दारूच्या नशेत चुकून सीमेपलीकडे गेला, असे कुटुंबीयांचे म्हणणे; तर तो भारताचा हेर होता, दोन ठिकाणी बॉम्ब उडवण्यात त्याचा सहभाग होता, हे मत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले. सरबजितसिंग हा खरेच भारतीय हेर होता का? याचे खरेखुरे उत्तर मिळालेच, तरी त्याला यापुढील कमीत कमी तीस वर्षे वाट पाहायला हवी. या संबंधीची गुप्त कागदपत्रे उघड करण्यासाठी ती कायदेशीर मुदत आहे. अर्थात, तीस वर्षांनी हे रहस्य उलगडेलच असेही नाही. कारण, आपल्या गुप्त फायली ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली उघड न करण्याकडेच बहुसंख्य राष्ट्रांचा कल असतो.   मात्र, सरबजितसिंग हेर नव्हता, असे कुटुंबीयांचे म्हणणे ग्राह्य धरले तर ‘हुतात्मा, ‘राष्ट्राचा शूर सुपुत्र असे उद्गार, 1 कोटी 25 लाख अशी आर्थिक मदत, राजकीय सन्मानासह अंत्यसंस्कार, केंद्रीय मंत्रिपरिषदेचे अंत्यसंस्कारप्रसंगी प्रतिनिधित्व, सत्ताधारी पक्षाच्या क्र. दोनच्या नेत्याची उपस्थिती या सर्वाचा अर्थ काय लागतो? तो आमचा हेर होता, याला आपण अप्रत्यक्षपणे मान्यता देत नाही का? जर सरबजितसिंग खरोखरच हेर असेल, तर प्रश्न आणखी किचकट होतो. कारण, या खटाटोपात सहभागी असल्याने धरला-मारला गेला असेल तर त्याच्या कुटुंबीयांना वार्‍यावर सोडायचे नसतेच; मात्र संकेतानुसार त्यांना जी मदत द्यायची, ती गाजावाजा करत द्यायची नसते. मध्ये काही काळ जाऊ देत प्रकरण थोडे थंड झाले म्हणजे पुढची पावले उचलायची असतात. मधल्या काळात त्या कुटुंबीयांना आर्थिक आधार पुरवणे ही खासगी, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून घडवणारी कार्यपद्धत रुजवावी लागते. त्यामुळे सरबजितसिंग हेर असो वा नसो, या प्रकरणी केंद्र शासनाचे वागणे अगम्य ठरते. माणसाच्या पृथ्वीवर वावरण्यात ‘शेती हा पहिला व्यवसाय. यावर वाद नाहीत. दुसरा व्यवसाय इतिहासक्रमात कुठला? एक मत हेरव्यवस्था असे, तर दुसरे वेश्या व्यवसाय असे. या चर्चेच्या तपशिलात न पडता, हेरव्यवस्था प्राचीन काळापासून प्रचलित आहे हे मान्य केलेच पाहिजे. तेव्हापासून राष्ट्रे (राष्ट्र-राज्य-नेशन-स्टेट ही संकल्पना अलीकडची) आपापले हेर फक्त शत्रू वा संभाव्य शत्रूच नव्हे, तर मित्र राष्ट्रांतही ‘पेरत आली आहेत. यात दोन पदर स्पष्ट आहेत. परक्या राष्ट्रांत आपले राजदूतावास असतात. त्यातले काही अधिकारी हे हेरगिरीसाठीच नेमलेले असतात. जर त्यांना अशा कृत्यासाठी त्या त्या राष्ट्राने ‘पकडले तर तुरुंग पाहावा लागत नाही; पण मायदेशी मात्र रवानगी होते. मात्र, दुसरा पदर जास्त धोके असलेला. त्यात सामान्य व्यक्ती हेरगिरीसाठी निवडली जाते.   या व्यक्ती आपल्या राष्ट्रातून पाठवल्या गेलेल्या असू शकतात वा त्या परक्या राष्ट्राच्या नागरिकही असू शकतात. जर हे उघड झाले तर पकडले जाणे, शारीरिक-मानसिक छळ, वेदनामय मृत्यू, तुरुंगवास, कुटुंबीयांना त्रास.. असा अनेकपदरी छळ असतो. असे हेर परक्या राष्ट्रांत पाठवणे काही वेळा फार अवघड असते. उदा. दुसर्‍या महायुद्धापूर्वीच्या जपानमध्ये परके राष्ट्र हेर व्यवस्था निर्माण करणार कसे? वंश, भाषा, सवयी, सामाजिक रीतिरिवाज सर्वच परके; परंतु असे हेर पेरण्यासाठी भारत-पाकिस्तान यांना तुलनेने परस्पर भूमी खूप अनुकूल आहे. वंश, भाषा, खाणे-पिणे, पेहराव, अनेक रीतिरिवाज खूपच सारखे आहेत. त्यामुळे इथला नागरिक तिकडे सहज सामावला जाऊ शकतो. दोन्हीकडे परस्पर द्वेष असलेले गट, त्यांच्या कडव्या विचारधारा आहेत. त्यातून हेर पेरण्यास मदत होते. लोभ, वासना, भीती, हाव असे अनेक घटक ‘हेर बनवण्यासाठी वापरले जात असले तरी गेल्या शतकापासून त्यात विशिष्ट ‘विचारधारेवर र्शद्धा असलेला नवा घटक आला आहे. त्यात कम्युनिझमवर प्रेम वा द्वेष, अतिरेकी इस्लाम, ज्यू, हिंदुत्व या धारेतून आलेले हेर जास्त कडवे असतात. हेच ‘गोर्‍या वंशवादी मंडळींसाठी लागू पडते.   ‘आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) ही खूप जुनी संस्था. काही इतिहासकारांनी या संस्थेची पाळेमुळे ‘पेंढारी व ठगी यांच्या विरुद्धच्या मोहिमेपर्यंत दाखवली आहेत. संस्थेची जवळपास सर्व कागदपत्रे भारत सोडताना ब्रिटिशांनी ‘पळवली वा नष्ट केली. जी काय थोडीबहुत वाचली (दुय्यम महत्त्वाची) ती पाकिस्तानात गेली. त्यामुळे भारताला संपूर्णपणे नाही, तरी बर्‍याच अंशी ब्युरोची नव्याने बांधणी करावी लागली. 1968 पर्यंत फक्त ‘आयबी ही देशपरदेशात हेरगिरीची जबाबदारी दिलेली संस्था होती. यातून परदेशासाठी ‘रॉ(रिसर्च अँड अँनालिसिस विंग) ही नवी यंत्रणा निर्माण करण्यात आली. 1993चे मुंबई बॉम्बस्फोट, अक्षरधाम, संसद हल्ला, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, वाराणसी इथले स्फोट, 26/11चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला यात स्थानिक माणसांचा सहभाग असल्याखेरीज हे सर्व घडवणे अशक्य आहे. त्याचा शोध, प्रेरणास्थानांचा माग हे शांतपणे, एकएक धागा जुळवत संभाव्य चित्र तयार करण्याचे काम आहे.   - पान 4 पाहा