जाहिरात
Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
  </>एव्हरेस्ट मोहिमेपासून अंतराळ सफरीपर्यंत आणि नाटक -साहित्यापासून ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणार्‍या प्रत्येक खेळापर्यंतच्या घडामोडींत रमणारे, जगण्यावर मन:पूत प्रेम करणारे प्रसिद्ध मोती व्यावसायिक आणि रसिकमनाचे कलावंत र्शीकांत लागू यांचे 7 मे रोजी निधन झाले. जगण्यावर रसरसून प्रेम केलेल्या या आपल्या परमस्नेहीचे ‘दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी रेखाटलेले हे हृद्य व्यक्तिचित्र.    सुरेश   भटेवरा  <4उ टँंल्ल (ळ1)>संधिसाधूंची   चलती   </4उ टँंल्ल (ळ1)> सत्तेच्या दरबारात मोकाट सुटलेल्या नातलगांची भ्रष्ट साखळी उजेडात आली आणि केंद्रात रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल राजीनामा प्रकरण घडले. सत्ताधारी निर्ढावले आहेतच, पण त्यांचे नातेवाईकही सोकावले आहेत, असा पाठोपाठ संतप्त सूर उमटला.   या निमित्ताने भ्रष्टाचारविरोधात येता-जाता कंठशोष करणारा शहाजोग मध्यमवर्गीय समाज आणि समाजाच्या मूक संमतीने देशात फोफावत गेलेली भ्रष्ट राजकीय संस्कृती याचा वेध घेतला आहे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी..  सुरेश   भटेवरा  03  06  05  <टं1ं3ँ्र 3>‘रसिकमधील लेख वाचा   </टं1ं3ँ्र 3> भ्र ष्टाचाराचे आरोप झेलत पवनकुमार बन्सल अखेर रेल्वेमंत्रिपदावरून गेले. 1984 मध्ये राज्यसभेवर व 1991 मध्ये लोकसभेवर निवडून आलेले बन्सल गेली 29 वष्रे भारताच्या संसदीय राजकारणात आहेत. यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला, तर स्वच्छ चारित्र्याचा लोकप्रतिनिधी अशी खरे तर त्यांची आजवरची राजकीय प्रतिमा. अशा मंत्र्यावर भारतीय रेल्वे विभागात महत्त्वाच्या नेमणुकीबाबत लाच घेतल्याचा आरोप झाला. बन्सल यांचा मतदारसंघ सांभाळणारा त्यांचा भाचा विजय सिंगला याने रेल्वेचा कारभार सांभाळणार्‍या रेल्वे बोर्डाच्या इलेक्ट्रिक विभागाच्या सदस्यत्वासह आणखी काही महत्त्वाची पदे चक्क विक्रीला काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. अनेक समस्यांना तोंड देत अगोदरच त्रस्त असलेल्या भारतीय समाजमनाला या प्रकरणाचा धक्का बसला.   रेल्वे बोर्डाच्या इलेक्ट्रिक विभागातर्फे लवकरच देशभर 2 हजार कोटींचे विद्युतीकरणाचे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. त्यावर डोळा ठेवून पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम पाहणार्‍या महेशकुमार यांनी हे पद मिळवण्याचा चंग बांधला, त्यासाठी मध्यस्थामार्फत बन्सल यांचे भाचे विजय सिंगला याला त्यांनी गाठले. महेशकुमार यांच्याकडून सिंगलाने 90 लाख रुपयांची लाच घेतली. असे म्हणतात की हा सौदा दहा कोटी रुपयांचा होता. तो पूर्ण होण्यापूर्वीच विजय सिंगला, महेशकुमार, एम.डी. मंजुनाथ, दलाल संदीप गोयल आदींना सीबीआयने रंगेहाथ पकडले. सर्वांची तुरुंगात रवानगी केली. लाचखोरीचे हे प्रकरण इतके स्पष्ट होते की त्यात रेल्वेमंत्रिपद वाचवण्याची कोणतीही पळवाट बन्सल यांना उपलब्ध नव्हती. तरीही पाच दिवस वेळकाढूपणाचा मार्ग विनाकारण अवलंबला गेला. त्यात बजेट अधिवेशनाच्या उत्तरार्धाची कोंडी झाली. अखेर अधिवेशन संपताच बन्सल यांची हकालपट्टी झाली..   आजवर स्वच्छ चारित्र्याचे बिरूद मिरवणारे बन्सल ज्या प्रकारे सीबीआयच्या जाळ्यात अडकले, ते दुर्दैवी चित्र पाहिले तर राजकीय तारांगणात विश्वास तरी कोणावर ठेवावा, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. भारतीय राजकारणावर भाई-भतिजागिरी, वशिलेबाजी इत्यादींचा प्रभाव अनेक वर्षांपासून आहे. वाट्टेल त्या मार्गांचा अवलंब करीत आपला स्वार्थ आणि आíथक हितसंबंध जपण्यासाठी राजकारणातले दलाल राजकीय सत्तेभोवती आपले जाळे फेकतात. मंत्री, अधिकारी व सत्तेच्या वलयांकित मखरात वावरणार्‍या नेत्यांचे नातेवाईक व कुटुंबीय अशा दलालांचे ‘सॉफ्ट टाग्रेट असते. विविध प्रकारची आमिषे दाखवून या रॅकेटियर्सकडून त्यांना जाळ्यात ओढले जाते. त्यांच्याकडून हवी ती कामे करवून घेतली जातात. एके दिवशी आप्तस्वकीयांमार्फत हा फास सत्तेवर असलेल्या मंत्र्यापर्यंत पोहोचतो. भारतीय राजकारणात नातेवाईकशाही व भाईभतिजागिरीचे प्राबल्य किती प्रभावी आहे, याचे दाखले देणारी अनेक उदाहरणे आहेत. रेल्वेमंत्री बन्सल यांचे लाच प्रकरण त्याचे ताजे उदाहरण. नातेवाइकांच्या उद्योगांमुळे भ्रष्ट ठरलेल्या नेत्यांची यादीच करायची झाली, तर ती बरीच लांबलचक होईल. कमीअधिक प्रमाणात देशातल्या बहुतांश राजकीय पक्षांत, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदेपर्यंत त्याचे अनेक धागेदोरे सापडतील. या काळ्या यादीची उजळणी करणे हा प्रस्तुत लेखाचा उद्देश नाही.     - पान 4 पाहा